ज्ञानंगंगा अभयारण्यच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही खासदार प्रतापराव जाधव
बुलडाणा(बौथा)येथील पलढग धरणाच्या जलाशयामध्ये केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार श्री. प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाने पर्यटन विकास योजने अंतर्गत ज्ञानंगंगा अभयारण्याच्या सर्वागीण विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.व मौजे तारापूर धरणाच्या क्षेत्रामध्ये वनपर्यटकांसाठी 52 लक्ष रु.च्या दोन इंजिन बोटीचे उदघाटन खा.प्रतापरावजी जाधव व आ.संजयजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.या मध्ये वन-पर्यटकांसाठी महिला बचत गट अंतर्गत उपहारगृह सुध्दा उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की ज्ञानगंगा अभयारण्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही त्यासाठी सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आमदार संजय गायकवाड यांनीही विकास कामात साठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली
व यावेळी खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड यांनी उपस्थित ज्ञानंगंगा अभयारण्य क्षेत्रातील बंधू-भंगीनी यांच्या शी संवाद साधला. व या कार्यक्रमासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती चे मुख्य वनसंरक्षक श्री.एम एस रेड्डी,ज्ञानंगंगा अभयारण्य प्रकल्पाचे डि.सी.एफ.खैरनार सर,डि.सी.एफ.गजभिये सर,तारापूर चे संरपच प्रविण जाधव,योगेश जी जाधव डॉ. गोपाल डिके, राहूल सोळंके,प्रविण निमकरडे,बाळु जाधव,व वनपरिक्षेत्र अभयारण्यचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.