पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बांधणार गाढव… नागरिकांनी केले न पा समोर ठिय्या आंदोलन
…
बुलडाणा प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या दिवसात बुलडाणा शहरातील इकबाल नगर परिसरासह इतर भागातील पाणी पुरवठा गेल्या 15 दिवसापासून खंडित असल्याने त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी घोडे आणि रिकामा रांजण घेऊन नगर पालिकेत एल्गार मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले, आणि नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय…
आणि जोपर्यंत पाणी पुरवठा केल्या जाणार नाही, तोपर्यंत नागरपालिके समोरून उठणार नाही अशी भूमिका यावेळी नागिकानी घेतल्याने नगरपालिकेत खळबळ उडाली होती, तर उपमुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गाढव बांधून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे…
तर नगरपालिकेतील पाणी पुरवठा अभियंता यांनी पाईपलाईन मध्ये लिकेज असल्याने दुरुस्ती साठी 4 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता, त्यानंतर कालपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे पाणी पुरवठा अभियंता राजेश गायकवाड यांनी सांगितले आहे…